दारव्हा तालुक्यात ” होऊ द्या चर्चा ” अभियानाद्वारे भाजपचा खोटारडेपणा व बोलघेवड्या योजनांचा भांडाफोड….
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने ” होऊ द्या चर्चा ” या उपक्रमांद्वारे भाजपचा खोटारडेपणा व बोलघेवड्या योजनांचा भांडाफोड दारव्हा तालुक्यातील ईरथळ, शेलोडी,वगळ,माऊली,भोपापूर या गावी शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) दारव्हा पदाधिकाऱ्यां मार्फत करण्यात आला.
आज मंगळवार दिनांक २६ सप्टेंबर रोजी बोरी सर्कल मधील गावोगावी जाऊन चावडीवर गावातील लोकांना एकत्रित करून भाजपचा खोटारडेपणा व बोलघेवड्या योजनांचा भांडाफोड यावेळी गावकऱ्यां समोर करण्यात आला.
याप्रसंगी अजय गाडगे तालुका प्रमुख, सुधाकर पिंगाणे तालुका संघटक,उप तालुका संघटक शंकर नागलवाडे, विभाग प्रमुख गजानन केंबल,गोपाल गायकवाड, संजयभाऊदेशमुख तथा शिवसेना पदाधिकारी व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.